Eknath Bhoir

कार्य

एकनाथ पर्व

इन्फ्रास्ट्रक्चर, सामाजिक उपक्रम आणि शिक्षणाच्या माध्यमातून वाघळे इस्टेटमध्ये प्रगतीचे पर्व.

मजबूत विकासाचा पाया

रस्ते, प्रकाश, पाणी – नागरिकांसाठी सोयीस्कर व्यवस्था.
पायाभूत सुविधा
  • रस्ते विकास
  • पाणी व जलव्यवस्था
  • प्रकाश व सार्वजनिक सुविधा

ज्ञानातून समाजसक्षमीकरण

ज्ञान ही खरी ताकद, उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल.
शिक्षण व सक्षमीकरण
  • शालेय सुधारणा
  • विद्यार्थी मदत
  • शैक्षणिक उपक्रम

निरोगी ठाण्यासाठी, स्वच्छतेचा संकल्प

स्वच्छता हीच सेवा, आरोग्य हाच अधिकार
आरोग्य व स्वच्छता
  • मोफत आरोग्य तपासणी
  • स्वच्छता मोहिमा
  • आरोग्य शिबिरे

संस्कृतीची मशाल, समाजोपयोगी कार्य

परंपरा आणि सेवा यातून समाजाचा आधार
सांस्कृतिक व समाजोपयोगी
  • पारंपरिक सण-उत्सव
  • समाजोपयोगी शिबिरे
  • सामाजिक एकतेचे उपक्रम

एकनाथ पर्वातील, कामांची झलक

जनतेच्या समस्या –
आमचे उपाय

वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे होते, पावसाळ्यात वाहतूक ठप्प व्हायची आणि अपघातांची शक्यता वाढायची. तसेच काही भागात पाणीपुरवठा नियमित नव्हता व अंधाऱ्या गल्ल्यांमुळे नागरिकांना सुरक्षेची समस्या भेडसावत होती. या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी खड्डेमुक्त रस्ते तयार केले, पाणीपुरवठा योजना सुधारून प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवले आणि सर्वत्र एलईडी स्ट्रीट लाईट्स बसवून सुरक्षित व प्रकाशमान वातावरण तयार केले.

आरोग्याच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून विविध मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि तपासणी मोहिमा आयोजित केल्या. परिसरातील स्वच्छतेसाठी नियमित स्वच्छता मोहीमा राबवल्या, कचरा व्यवस्थापन सुधारले. महिलांसाठी सुरक्षाविषयक जनजागृती, ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत केंद्र आणि स्थानिक संघटनांमार्फत सामाजिक एकोप्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले. यामुळे समाजात आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध झाल्या.

शाळा व महाविद्यालयांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला, वर्गखोल्या व वाचनालये अधिक आधुनिक केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य दिले. करिअर मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षा तयारी केंद्रे, तसेच कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून तरुणांना नोकरी व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे शिक्षणाबरोबरच तरुणांना आत्मविश्वास, दिशा आणि भविष्यातील संधी मिळाल्या.

नागरिकांना तातडीने तपासणीची व उपचारांची गरज भासत होती. त्यामुळे विविध मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि मोफत औषधवाटप कार्यक्रम राबवले. या उपक्रमांमुळे अनेकांना तातडीची आरोग्यसेवा मिळाली आणि जनजागृतीही झाली.

गल्ली-बोळात कचरा साचल्यामुळे दुर्गंधी व रोगराई वाढत होती. यावर उपाय म्हणून स्वच्छता मोहिमा राबवल्या, नियमित कचरा उचलणी केली व कचरा व्यवस्थापन सुधारले. परिणामी परिसर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी झाला.

महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटत नव्हते. म्हणून स्वसंरक्षण कार्यशाळा, हेल्पलाईन सुविधा व जनजागृती मोहीमा राबवण्यात आल्या. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण झाली.

तरुणांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये शिकण्याची संधी मिळत नव्हती. म्हणून रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम, संगणक शिक्षण व उद्योगधंद्यांशी निगडित कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन वाटा खुल्या झाल्या.

नागरिकांचे
अभिप्राय

Rated 5 out of 5

आमच्या कार्याची खरी कहाणी – तुमच्याच नजरेतून!

आमच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पायाभूत कामांची झलक आता व्हिडिओ स्वरूपात पाहा.

Scroll to Top